राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांकडून India Today वृत्त संस्थेला एक खडसावणारे पत्र पाठवण्यात आले आहे. खोट्या बातम्या पसरवून राष्ट्रपती भवनाची गरिमा धोक्यात आणल्यामुळे हे पत्र लिहिले गेले आहे.
काय आहे प्रकरण?
२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण केले होते.

ह्यानंतर ट्विटर वरून अनेक लोकांनी ही प्रतिमा नेताजींची नसून बंगाली अभिनेते प्रसेनजित चटर्जी ह्यांची आहे असा दावा करायला सुरुवात केली. असा दावा करणाऱ्यांमध्ये इंडिया टुडे चे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, त्यांच्या पत्नी पत्रकार सागरिका घोष हे सुद्धा होते.

दिवसभर चाललेल्या ह्या वादावर अखेर नेताजींच्या कुटुंबातील श्री सी के बोस ह्यांनी हे पोर्ट्रेट नेताजींचे असल्याचे सांगितल्यावर पडदा पडला.
Portrait unveiled by the Hon’ble President of India-Shri Ram Nath Kovind ji @rashtrapatibhvn is based on #Netaji's original photograph.Its an artists impression of #Netaji. https://t.co/chtZk1a9l2 pic.twitter.com/MkQGEtFq5d
— Chandra Kumar Bose (@Chandrakbose) January 25, 2021
This is the original photograph of #NetajiSubhasChandraBose, based on which renowned artist Shri #PareshMaity has drawn the portrait which was unveiled at Rashtrapati Bhavan on 23 Jan 2021, by Hon’ble President of India-Shri Ram Nath Kovind ji. @rashtrapatibhvn @narendramodi pic.twitter.com/WTOHqtgs3p
— Chandra Kumar Bose (@Chandrakbose) January 25, 2021
राष्ट्रपती भवनाकडून मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसते आहे. थेट राष्ट्रपतींच्या कृत्याला चूक आणि वेडेपणाचे ठरवणारी ट्विट करणाऱ्या पत्रकारांनी किमान आधी खरे काय आहे ह्याची खात्री करून घेणे अपेक्षित होते असे ह्या पत्रात म्हणण्यात आले आहे. व्यावसायिक नैतिकता तर ह्यांनी सोडलीच परंतु आपल्या ह्या कृत्याने राष्ट्रपती भवनाची गरिमा धोक्यात आणली असे म्हणत इंडिया टुडे च्या अरुण पुरींना राष्ट्रपती भवनाकडून खडसावण्यात आले आहे.

आता इंडिया टुडे समूह राजदीप सरदेसाई आणि आपल्या इतर चुकलेल्या पत्रकारांवर काय कारवाई करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ट्रॅक्टर रॅली दरम्यान टीव्ही वर खोटी बातमी दिल्याने सरदेसाई ह्यांच्यावर आधीच आपला पगार गमावण्याची वेळ आलेली आहे.
राष्ट्रपती भवन ह्या प्रकारात कुठली कायदेशीर कारवाई करणार का हा प्रश्नही आता सर्वांना पडला आहे.